राजगड तालुका प्रशासनास दिले निवेदन
वेल्हे,
स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावर शिवभक्तांनी विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविले असल्याचा ठपका ठेवत पुरातत्व विभागाने सतर्कता दाखविल्याने पोलीस बंदोबस्तात एका रात्रीत पुतळा हटवला असल्याची घटना नुकतीच घडली.तशाच प्रकारे प्रशासनाने सतर्कता दाखवून राजगड किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारावा. व शिवप्रेमींवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशा आशयाचे निवेदन वेल्हे प्रशासनास तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी ,शिवप्रेमी व युवासेना शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार (ता.३०) रोजी देण्यात आले.
प्रशासनास निवेदन देण्याच्या अगोदर तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी शिवप्रेमी व युवा शेतकरी संघाचे पदाधिकारी यांची मार्गासनी (ता.राजगड) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास चोरघे,उपाध्यक्ष सचिन ढोरे,आरपीआयचे तालुकाध्यक्ष कुंदन गंगावणे,मार्गसणीचे माजी सरपंच गोपाळ इंगुळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथ वालगुडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शैलेश वालगुडे, अशोक चोरघे, सागर मोझर, चंद्रकांत मोरे, खंडू गायकवाड, भगवान खुटवड, विठ्ठल वालगुडे, विशाल वालगुडे,दत्ता पानसरे, निलेश पवार, नाना शिर्के आदी शिवभक्त उपस्थित होते.
दरम्यान तालुक्यातील शिवप्रेमी तसेच शेतकरी युवा संघटनेचे पदाधिकारी व प्रशासनात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि, तोरणा व राजगड किल्ल्यांवरील शिवप्रेमींसाठी शिवस्मारक उभारणीस परवानगी देण्यात यावी. स्मारकामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल तसेच युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम आणि स्वाभिमान यांचा सन्मान वाढेल.
