- पोलीस अधीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश
- दाखल गुन्ह्याला लागले वेगळे वळण
पुणे, शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध कंपनी बळकावन्याचा आरोप करत दाखल गुन्ह्यातील आरोपींनी पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रारकरून न्याय मागितला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीच काहींना हाताला धरून हा उद्योग केला असल्याचा आरोप केला आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंद करून कंपनीत कसलाही संबंध नसताना मालकाच्या मुलालच अटक केली. सेटलमेंट न झाल्याने हा गुन्हा नोंदवल्याचे म्हंटले आहे. आता याप्रकरणात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडून चौकशी सुरू केली आहे.
डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रा. लि. ही कंपनी कोंबड्या व इतर पशूंचे खाद्य बनवते. दिवसाला साधारण अडीच ते तीन लाखांचा टर्नव्होअर या कंपनीचा आहे. दरम्यान सचिन वाळके यांच्या वडिलांनी ही कंपनी उभा केली.
जवळची नातेवाईक असलेले व माजी सैनिक राहुल वाळके यांच्या पत्नी रेश्मा राहुल वाळके यांना कंपनीचे कामकाज पाहण्यास ठेवले होते. मात्र त्यांनी काही महिन्यातच कंपनीच्या लेझर खात्यातून अथर्व पोल्ट्री फार्म या त्यांच्या स्वतःच्या कंपनीत 53 पंख 67 हजार 681 रुपये ट्रान्स्फर केले. विश्वासाने कामकाज दिले असताना त्यांनी तक्रारदार यांचा विश्वासघात केला. हा प्रकार तक्रार यांच्या निदर्शनास आला. नंतर त्यांनी याबाबत जाब विचारला. तेव्हा रेश्मा यांनी त्या भागीदार नसताना व कंपनीच्या डायरेक्टर बॉडीवर नसतानाही पदाचा (भागीदार) राजीनामा म्हणून दिला. उलटपक्षी त्यांनीच शिरूर पोलीस ठाण्यात सचिन वाळके यांच्यासह चौघांवर पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुन्हा नोंद केला. त्यात सचिन वाळके यांना अटक देखील केली. पण, सचिन वाळके यांचा न्यायालयाने जामीन केला आहे.
दरम्यान, सचिन यांनी ऍड, आम्रपाली धीवर यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर अर्ज दाखल केला असून, यात करण्यात आलेला अन्याय मांडला आहे.
याबाबत ऍड. धीवर यांनी सांगितले की, सचिन यांना चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात नाव घेतले. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. तर यातील रेश्मा वाळके या भागीदार नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिरूर पोलीसाना हाताशी धरून गुन्हा नोंदवला. आमचे आशील सचिन यांनी प्रथम अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावर काहीच कारवाई केली नाही.पण, यांच्या एका अर्जावर गुन्हा नोंदवला. धक्कादायक म्हणजे,वरिष्ठ अधिकारी याना देखील या प्रकाराबाबत कसलीही माहिती नाही, अशीही माहिती समोर आली आहे. याबाबत सर्व बाजू पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या समोर मांडली आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले, अशी माहिती सचिन वाळके यांनी दिली आहे.
- रेश्मा वाळके कंपनी मध्ये भागीदार नसताना राजीनाम्याचा मुद्दा कसा उपस्थित झाला .
- संभाजी वाळके हे कंपनी चे एकुलते एक मालक आहेत.
- संभाजी वाळके यांनी कुठलाही करार रेश्मा यांच्या सोबत केलेला नाही. किंवा त्यांना कुठलेही नियुक्ती पत्र दिलेले नाही.
- पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याप्रकरणाची संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार डीवायएसपी मायने हे चौकशी करत आहेत. यासंदर्भात आज अहवाल सादर केला जाणार आहे.
- सचिन वाळके यांच्या वकील ऍड. आम्रपाली धीवार यांनी न्यायालयात काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यानुसार न्यायालयाने तपासी अधिकारी यांना स्टेशन डायरी, केस डायरी, व नोंदी आणि गुन्ह्याचे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ऍड. आम्रपाली धीवार
